भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशपुर येथील मिशन ग्राऊंडवर भुमाफियांनी प्लाट पाडून सर्रास बांधकाम सुरु केले असताना येथील सर्व नागरिक एकवटले असून सदर चालू असलेल्या भुमाफियांच्या तावडीतून गणेशपूर येथील मिशन ग्राऊंडला वाचविण्यासाठी सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी व येथील रहिवाशी धावून आले असून आज उपविभागीय अधिकारी याच्या दालनात मिशन ग्राउंड चा विषयावर एनीटीपी संदर्भात आज सुनावणी दरम्यान जनतेच्या साक्षीने आक्षेपार्थक म्हणून मुद्दा मांडला व आपली बाजू जनतेच्या वतीने मांडली. तसेच अनेक गणेशपुरवासींनी मिशन ग्राउंड वाचले पाहिजे यावरभूमिका स्पष्ट केली. सदर मिशन ग्राउंड संदर्भात ग्रामवासीयांचीे भूमिका ठाम असून या जमिनीला व ग्राउंड ला विक्री होऊ देणार नाही, असा सुर गणेशपूर वासीयानी व्यक्त केला.