१२ जूनला सालई खुर्द येथील घरकूल लाभार्थी ठोकणार ग्रामपंचायत कार्यालयाला ताला

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील सालई खुर्द येथील शिवाजी नगर मधील मागील ३५-४० वर्षांपासून अतिक्रमण जागेवर वास्तव्य करीत असलेल्या गोरगरीब, वंचित, बेरोजगार, बेघर लाभाथ्यार्ना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ‘ब’ यादीतील १४ तर “ड” यादीमधील १२ घरकुल मंजूर असून बांधकामासाठी परवानगी द्यावी अन्यथा सोमवार दि.१२ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता पासून ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण करून ग्रा.प. कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन घरकुल लाभार्थ्यांनी मोहाडी प.स. गटविकास अधिकारी, मोहाडीचे तहसीलदार, आंधळगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार व ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. यावेळी गणेश राणे, प्रफुल मेश्राम, विष्णु राऊत, दुर्योधन राऊत, प्रकाश पटले, गजानन राऊत, परसराम मांढरे, विजय मांढरे, लाखन ठाकरे, तेजराम राऊत, धुर्पता मेश्राम, सुरचंद नेवारे, संभाजी मांढरे, नरेश कोहळे, शिवदास पटले, कैलास राऊत, रोहित सोनवणे, सुरेश सोनवणे, भारत कोहळे आदींच्या सहीनिशी निवेदन दिले आहे.

ग्रामीण भागातील निवासी वापरासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय असला तरी अतिक्रमण धारकांना याचा फायदा होताना दिसतनाही आहे. सदर अतिक्रमण जागेवर जवळपास ३४ कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २०२०-२१ मध्ये १४ लाभार्थ्यांचे घरकुल आले. मात्र अतिक्रमण जागेवर शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने त्यांचे तीन वर्षांपासून घरकुल रखडले आहे. मात्र अतिक्रमण धारकांचे घरकुल मंजूर करून त्यांना रीतसर परवानगी देण्याचे आश्वासन अनेक वेळा देतात मात्र आश्वासन वेळेपूर्ती ठरतो. सदर अतिक्रमण जागेवर यापूर्वी २०१३-१४ मध्ये विष्णू राऊत, गजानन राऊत, फिरतलाल मांढरे या तीन लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करून बांधकाम पूर्ण केले आहे. मात्रआता ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा अडथळा नसताना नमुना ८ वर अतिक्रमण नोंद केल्यामुळे सदर जागेवर घरकुल बांधकामाला ग्रामपंचायत कोणत्याही प्रकाराची मंजुरी देत नसल्यामुळे लाभार्थी अनेक वर्षांपासून वंचित असल्याचे दिसत आहे.

मात्र अनेक गावांमध्ये अतिक्रमण किंवा शासनाच्या जागेवर घरकुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. हे विशेष. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना घरे मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, मात्र ही योजना फोल ठरली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रधानमंत्री आवाज योजना अंतर्गत घरकुल मंजूर असून सुद्दा ग्रामपंचायतीच्या चुकीच्या धोरणामुळे लाभार्थी वंचित आहेत. सदर जागेवर घरकुल बांधकामाची परवानगी का मिळत नाही अशा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. ग्रामपंचायत म्हणतो ती अतिक्रमण म्हणून राखीव जागा आहे तर अतिक्रमण जागेवर शौचालय, आंगणवाडी, इमारत, रस्ते इतर योजना व शासनाचे कामे कसे होतात, गोरगरिबांच्या डोक्यावरील छत मिळत नसल्याने गोर गरीब गवताच्या झोपडीत राहत आहे. त्यामुळे घरकुल बांधकामाची परवानगी द्या, अन्यथा सालई खुर्द ग्रामपंचायत समोर बेमुदत आंदोलन व ग्रा.प. कार्यालयाला ताला ठोको करण्याचा ईशारा दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.