भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली द्वारा प्रायोजित वैनगंगा पांगुली सांस्कृतिक महोत्सव भंडारा गोंदिया २०२३ अंतर्गत ११ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट दरम्यान खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये जिल्हास्तरीय महोत्सव दिनांक २७, २८ व २९ आॅगस्ट रोजी लाखनी व साकोली तथा इतर तालुक्यातही आयोजित केला आहे. परंतु मणिपूर राज्यात मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना आदिवासी तरुणीवर व महिलांवर सामूहिक रित्या अत्याचार करून नग्न धींड काढण्यात आले.
लाखो लोक बेघर झालेत असे लाजिरवाणे घृणास्पद अमानवीय कृत्य देशात विविध स्तरावर आदिवासींवर होणारे अत्याचार यावर भारत सरकार कुठलीही भूमिका घेत नाही व देशाच्या राष्ट्रपती ह्या आदिवासी असताना एकही शब्द बोलत नाही. या घटनेतील घृणास्पद कार्य करणारे आरोपी मोकाट फिरत असून अजून पर्यंत शासन प्रशासनातर्फे या घटना थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलत नसल्यामुळे आदिवासी समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे, असे असताना देखील आदिवासी समाजाच्या जखमावर मीठ चोळून त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचे काम होत आहे. त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या आदिवासी सांस्कृतिक महोत्सवावर जोपर्यंत मणिपूर राज्यातील घृणास्पद घटना घडवून आणणाºया आरोपींना सामूहिकरित्या फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत असे कसलेही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, जर असे कार्यक्रम आयोजित केले असल्यास ते त्वरित रद्द करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन नागपूर जिल्हा शाखा भंडारा च्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
व अशा प्रकारचे आयोजन शासन स्तरावर केले गेले तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून विरोध व निषेध करण्यात येईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो तसे झाल्यास त्याला शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन जिल्हाध्यक्ष धर्मराज भलावी, कार्याध्यक्ष अशोक उईके, अजबराव चिचामे, हरिभाऊ येलणे, प्रभाताई पेंदाम जिल्हाध्यक्ष महिला फेडरेशन भंडारा, जगनजी उईके, पवन कुमार टेकाम, ओमप्रकाश कुंभरे, गणपत मडावी, राजकुमार परतेकी, डी. के. कुंभरे, आदींनी दिले आहे. तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील कुठल्याही आदिवासी समाज बांधवांनी या महोत्सवात सहभाग नोंदवू नये असे आवाहन देखील करण्यात आले.