भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर, मोहाडी मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर परिस्थितीने शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना भरपाई व पीक विमा मिळावा या प्रमुख मागण्यांच्या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. यावर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा यांना त्वरित फोन करून पूर परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा पंचनामा करून लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा अशा सूचना केल्या. तसेच राज्य सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणीत सैदैव पाठीशी उभा असून लवकरात लवकर आर्थिक सहाय्यता करणाचे आश्वासन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्याचे आ.कारेमोरे यांनी सांगितले.