भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : ‘जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणण्याचा, तसेच आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव’, ‘एक है तो सेफ है’ आदी मुद्द्यांचा पुनरुच्चार करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात मध्यमवर्गाचा ठळक उल्लेख करून, ‘मध्यमवर्गीयांची प्रगती होते, तेव्हा देशाचीही प्रगती होते’ असे वक्तव्य केले. पुणे जिल्ह्यातील २१ आणि सातारा जिल्ह्यातील १० अशा एकूण ३१ विधानसभा मतदासंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची सभा झाली. भारतीय जनता पक्ष-राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नेहमीच मध्यवर्गीयांना प्राधान्य दिले आहे. मध्यमवर्ग हा देशाचा कणा आहे. हाच वर्ग संपत्ती निर्माण करतो. देशाची अर्थव्यवस्था तिसºया क्रमांकावर जाण्यात मध्यमवर्गाचा मोठा वाटा आहे, असे प्रशंसोद्गार पंतप्रधानांनी काढले. काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतील अन्य पक्ष वा नेत्यांवर थेट टीका करण्याचे टाळून पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मध्यमवर्गासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचून एक प्रकारे भाजपच्या शहरी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. मध्यमवर्गाच्या अपेक्षा आणि आकांक्षांची आम्हाला पूर्ण जाणीव असून, त्या पूर्ण करण्यासाठी प्राधान्य राहील, असे आश्वासन देतानाच, राज्यातील संस्कृतीचे संरक्षण आणि प्रसारासाठी महायुतीने पावले उचलली असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मराठीजनांची अनेक दशकांची मागणीही पूर्ण केली आहे असेही मोदी यांनी सांगितले.
भाजप सरकारचे नेहमीचमध्यमवर्गीयांना प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे मध्यवर्गाच्या हिताचे निर्णय घेऊन धोरणे आखली जात आहेत. प्राप्तिकर सवलत, मूल्यवर्धित करातील (व्हॅट) कपातीचा फायदा नागरिकांना मिळाला आहे. उपचारांच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी मध्यवर्गीयांंना दिलेल्या सवलीतमुळे ३० हजार कोटींची बचत झाली आहे. हृदयविकाराच्या उपचारांसाठी वापरले जाणारे ‘हार्ट स्टेन्ट’ स्वस्त झाल्यामुळे मध्यमवर्गाला फायदा झाला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आयुष्मान योजनेमुळे ७० वर्षांवरील ज्येष्ठांना दिलासा, गरिबांना पक्की घरे, मध्यमवर्गीयांच्या घरांना अनुदान, विद्यालक्ष्मी योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी दहा लाखांपर्यंतचे स्वस्त कर्ज, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गेल्या दहा वर्षांत एक लाख नव्या जागांची निर्मिती, स्पेस स्टार्टअपसाठी एक हजार कोटींच्या विशेष निधीची तरतूद, नोकºयांसाठी विशेष पॅकेज, मोठ्या कंपन्यांत इंटर्नशिप आदी योजनांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, राज्याचा वारसा सुरक्षित करण्यासाठी स्मारकांची कामे पूर्ण झाली आहेत. विदेशी मानसिकतेच्या भूमिकेतून काँग्रेसने केवळ द्वेषापायी त्याकडे दुर्लक्ष केले होते. महाविकास आघाडीचे हे कारस्थान राज्यातील जनता यशस्वी होऊ देणार नाही. विकास आणि लोकांच्या हिताच्या मुद्यांना प्राधान्य देणाºया महायुतीला पुन्हा संधी देण्यासाठी आणि राज्याच्या, देशाच्या प्रगतीचा आधार होण्यासाठी एक व्हावे लागेल. एकत्र आलो तरच सुरक्षित राहू.