पंचायत राज व्यवस्थेमुळे गावांचा विकास साधला लायकराम भेंडारकर यांचे प्रतिपादन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पंचायत राज व्यवस्थेमध्य गाव, तालुका आणि जिल्हयाचा समावेश करण्यात आल्यामुळेच गावांचा विकास साधता आला असा ठाम विश्वास गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केला. ते नवेगावबांध येथे आयोजित सरपंच मेळाव्यात अध्यक्ष पदावरून बोलत होते. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला. मंचावर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, सभापती दीपाताई चंद्रिकापुरे, पौर्णिमाताई ढेंगे, रजनीताई कुंभरे, डॉ. लक्ष्मण भगत, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी लोखंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, फारेंद्र कुतीरकर, मधुकर वासनिक, माजी अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी सभापती सविताताई पुराम सर्व गटविकास अधिकारी तसेच पंचायत समित्यांचे सर्व सभापती, जिल्हा परिषद सदस्य, औरंगाबादचे भास्कर पेरे पाटील, सांगलीचे श्रीधर कुलकर्णी आणि सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष बहेकार उपस्थित होते.

भेंडारकर पुढे बोलताना म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्याची सुमारे ८२ टक्के लोकसंख्या खेडे गावात राहते, या सर्व ग्रामपंचायती स्वयंपूर्ण व्हाव्यात असा आमचा निर्धार आहे. त्यामुळे पाटोदा ग्रामपंचायती प्रमाणे तुम्हीही शासकीय योजनानंच्या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम म्हणाले की, आता ग्रामपंचायती राज्यकारभाराच्या घटक झाल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य, साफसफाई, स्वच्छता, पाणीपुरवठा व शिक्षण या दृष्टीने ग्रामपंचायतीना अधिकार मिळाले असून त्याची जबाबदारी सरपंचांवर आहे. ग्रामपंचायतीना शासना कडून पुरेसा निधी मिळत असल्यामुळे आपले गांव स्वयंपूर्ण करा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष हर्षे यांनी सरपंचाना मार्गदर्शन करताना, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

या प्रसंगी बोलताना सांगलीचे विस्तार अधिकारी यांनी पंचायत विकास निदेर्शांकाची विस्तृत माहिती देऊन शास्वत विकास ध्येयाच्या ९ संकल्पनांची माहिती दिली. पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पेरे पाटील म्हणाले की, आजच्या काळात माणसाचे आयुष्य कमी आणि देशावरचे कर्ज अधिक होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून आयुष्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी विनंती त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, आपल्या ग्रामपंचायतीचे ४० लाख रुपयाचे उत्पन्न असून यामुळे ग्रामपंचायत सुजलाम सुफलाम झाली आहे. ग्रामिणाना आरोग्याचा सल्ला देतांना श्री पाटील म्हणाले की,आपलं गांव स्वच्छ ठेवा, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच शिक्षण यावर भर देण्याची गरज असून म्हाताºया मंडळींवर प्रेम करा. संत तुकाराम महाराजांचे सरपंचाना अभंग सांगून, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे असे आव्हान श्री पेरे पाटील यांनी केले.

याप्रसंगी शासनाकडून पुरस्कार प्राप्त केलेल्या, पंचायत समिती तिरोडा, ग्रामपंचायत भजेपार, डव्वा, दररेकसा, शिवणी, गंगाझरी, नहरटोला, देवलगावं, भररेगाव, कमरगाव, कुंभीटोला, कातूर्ली, बोदरा, खोडसीवणी, तिरखेडी, अंभोरा आदि ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा, पाणी गुणवत्ता आदि विषयावर सादरीकरण करण्यात आलं. याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, अजुर्नी मोर च्या गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.आय. वैद्य यांनी पाहुण्यांचेस्वागत केले. महापुरुषांच्या छायाचित्रांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी आरोग्य विभाग आणि बचत गटांच्या महिलांनी स्टॉल्स उभारले होते. कार्यक्रमाचे संचालन करून विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे आणि माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम यांच्या मार्गदर्शनात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासनिक, गुणवंत ठाकूर, पंकज पटेल, दिलीप चौधरी, सुनील चव्हाण, कविता राठोड, ज्ञानेश्वर कानडे, श्याम समरीत, राजश्री गौतम, पृथ्वीराज कोल्हटकर, नरेश लांजेवार, प्रकाश तिरेले, रोहित बन्सोड, जगमोहन दास तसेच विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाºयांनी अथक परिश्रम घेतले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *