भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एप्रिल पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करून नागरिकांना शुध्द स्वच्छ गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात दि. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत नळ योजनेसह शाळा, अंगणवाडी मधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. या अभियानात ग्राम पंचायतस्तरीय यंत्रणांनी सहभागी होऊन स्त्रोतांची रासायनिक तपासणी वेळेत पूर्ण करावी असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी गावस्तरावरील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करून नागरिकांना शुध्द स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते.
ग्राम पंचायतस्तरावरील जलसुरक्षकांमार्फत उपविभागीय प्रयोग शाळा भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखांदूर व पवनी येथे पाणी नमुने गोळा करून तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे निदेर्शानुसार दिनांक १ एप्रिल ते ३० जून २०२५ या कालावधीत पावसाळापूर्व रासायनिक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या निर्देशीत केलेल्या कालावधीत नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्याचे राज्यस्तरावरून निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पाणी गुणवत्ता शाखेच्या वतीने दिनांक १ एप्रील ते ३० जून २०२५ या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांचे मार्गदर्शनात, प्रकल्प संचालक (जजीमि) माणिक चव्हाण यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे रासायनिक तपासणी पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
एपिल ते जून या तीन महिण्याच्या कालावधीत रासायनिक पाणी तपासणीकरीता गावस्तरावरून जल सुरक्षकांमार्फत पाणी नमुने गोळा करून उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यास गटविकास अधिकारी, पंचायत समिती सर्व यांना निर्देश देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांचे अधिनस्थ असलेल्या अधिकारी, कर्मचाºयाच्या माध्यमातून रासायनिक पाणी नमुने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तपासणी करण्यात येणाºया स्त्रोतांतध्ये नळ पाणी पुरवठा योजनेचा स्त्रोत, त्यानंतर पहिला, मधला व शेवटचा नळ तसेच शाळा, अंगणवाडी येथीलस्त्रोताचे पाणी नमुने प्रयोगशाळांना गोळा करायचे आहेत. त्यानंतर त्या स्त्रोतांच्या त्या नमुण्यांची तपासणी करून केंद्र शासनाचे पाणी गुणवत्ता संकेतस्थळावर नोंदी घेतल्या जाणार आहेत. पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये दूषित आढळून आलेल्या स्त्रोतांवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करून त्याच्यांही नोंद या संकेतस्थळावर घेतल्या जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिनांक १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासानिक तपासणी महत्वाची आहे. शासकिय यंत्रणांनी सहभागी होऊन पिण्याच्या पाण्याची स्त्रोतांची रासायनिक तपासणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे.