भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- सद्या उन्हाडी पिकांसाठी ८ तास शेती वीज आपूर्ति होत असल्याने, पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शेतकºयांच्या या गंभीर प्रश्नाबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी फेब्रुवरी महिन्यात तत्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईल संदेश पाठवून शेतीचा वीजपुरवठा १२ तासांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने या संदेशाला तात्काळ प्रतिसाद दिला आणि वीज विभागाला १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या आदेशानुसार, वीज विभागाने शेतीसाठी १२ तास वीजपुरवठा केला, ज्यामुळे शेतकºयांनी रब्बी आणि उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली, परंतु आता भर उन्हाड्यात वीज विभागाने वीजपुरवठा १२ तासांवरुन ८ तासांपर्यंत कमी केल्याने ही समस्या पुन्हा गंभीर झाली आहे. सरकारी आदेशांची अंमलबजावणी न केल्याने आमदार विनोद अग्रवाल पुन्हा आक्रमक झाले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सु- हास रंगारी, अधीक्षक अभियंता रामाराव राठौड़, कार्यकारी अभियंता आनंद जैन, यांच्याशी चर्चा करून आणि पत्र देऊन, रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना पूर्वीप्रमाणेच १२ तास वीजपुरवठा करण्याची मागणी केली.
शेतकºयांनी १२ तास विजेची उपलब्धता लक्षात घेऊन रब्बी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. परंतु वीज ८ तासांपर्यंत कमी केल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वीजकपातीबाबत शेतकºयांमध्ये प्रचंड संताप आहे. या निर्णयामुळे शेतकºयांमध्ये व्यापक असंतोष निर्माण झाला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर शेतकºयांना तात्काळ १२ तास वीजपुरवठा पूर्ववत केला नाही, तर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी विभागाची असेल. निवेदन देताना आमदार विनोद अग्रवाल यांनी म्हणाले. या वेळी सरपंच संदीप तुरकर, विक्की बघेले, ललित खजरे, लुकेश बंशपाल, रुद्रसेन खांडेकर, रूपचंद पटले, हीराजी बघेले, संजय कुंभलवार, अक्षय कहनावत, मुकेश बघेले, राहुल पटले, हरलाल बघेले, आणि किसानबंधु उपस्थित होते.