भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया-बरौनी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाºया दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या कडून १० किलो ३६८ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. पुढील कारवाईसाठी नागपूर आयकर विभागाला कळवले. ९ एप्रिलरोजी रात्रीच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली आहे. नरेश कन्हैयालाल वलेछा (६२) रा. सिंधी कॉलनी आणि विष्णू गोपीचंद नागभिरे (५४) रा. श्रीनगर वॉर्ड गोंदिया ही संबंधित प्रवाशांची नावे आहेत. विभागीय कार्य दल निरीक्षक प्रभारी कुलवंत सिंग, उपनिरीक्षक राहुल पांडे, सहायक उपनिरीक्षक धर्मेंद्र कुमार, हवालदार विशाल थावरे, उपनिरीक्षक दीपक कुमार, हेड कॉन्स्टेबल निखिलेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया रेल्वे स्थानकावर बरौनी एक्स्प्रेसची तपासणी केली. त्यातील नरेश वलेछा आणि विष्णू नागभिरे या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली असता त्याच्या पिशवीत १० किलो ३६८ ग्रॅम चांदीचे दागिने सापडले, ज्याचीअंदाजे किंमत ९ लाख ७४ हजार ५९२ रुपये आहे. त्याच्या कडे या दागिन्यां संदर्भात चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत.
दोन्ही प्रवाशांकडून वरील चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून ते नागपूर आयकर विभागाकडे चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. असेच एक प्रकार गुरुवार ०३ एप्रिल रोजी विभागीय कार्यकर्ता पथकाचे प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंग, सहायक उपनिरीक्षक धर्मेंद कुमार, जी. आर मांडवी, ए.आर. रायवार आणि गुन्हे गुप्तचर शाखा, गोंदिया यांच्या संयुक्त चौकशीत काळ्या-निळ्या रंगाच्या पिशवी मध्ये एक व्यक्ती फलाट क्र. ३ गोंदिया रेल्वेस्थानका तील स्थानक व्यवस्थापक कार्यालया समोर सायंकाळी ६ वाजता हातात बॅग धरून संशयास्पद स्थितीत फिरत असताना पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. पुढे चौकशीत त्याने आपले नाव राकेश गोकुळदास आहुजा (५१, रा. गोंदिया, श्रीनगर, मालवीय वॉर्ड रामचंद्र आॅइल मिल जवळ असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पिशवीत ९ लाख १० हजार रुपये सापडले होते. सदर रोख रक्कम ट्रेन मधून नेण्यासाठी वैध अधिकार आणि कागदपत्रे मागितली असता, त्याच्याकडे व्यवहाराचे कोणतेही वैध कागदपत्र नव्हती. रेल्वेतून रोख रकमेची अवैध वाहतूक झाल्याची बाब आयकर विभाग, नागपूरला कळवण्यात आली होती. या जप्त केलेल्या रकमेची ही चौकशी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येत आहे.